31.9 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामविकास ते जलसंपदा; राज्यासाठी ८ महत्त्वाचे निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामविकास ते जलसंपदा; राज्यासाठी ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

१) ग्राम विकास विभाग:

  • राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार.
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदा यांना एकूण १,९०२ पुरस्कार.
  • ‘उमेद’ ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारणी. ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ.

२) सहकार व पणन विभाग:

  • ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी.
  • राष्ट्रीय बाजारतळ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा.
  • महाराष्ट्रातील १३३ बाजार समित्या आधीच ई-नामशी जोडलेल्या.

३) विधि व न्याय विभाग:

  • महिलांवरील अत्याचार प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय.
  • पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन.

४) जलसंपदा विभाग:

  • वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) दुरुस्ती व वितरणासाठी २३१.६९ कोटींची मंजुरी.
  • वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) दुरुस्ती व वितरणासाठी १९७.२७ कोटींची मंजुरी.

५) महसूल विभाग:

  • महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेस ठाणे (कळवा) येथे ॲडव्होकेट अकॅडमीसाठी जमीन मंजूर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.9 ° C
31.9 °
31.9 °
61 %
1.9kmh
96 %
Thu
31 °
Fri
34 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!