28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रपाटील इस्टेट मधील राहिवाशांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पुनर्विकास नाही - मनिष आनंद

पाटील इस्टेट मधील राहिवाशांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पुनर्विकास नाही – मनिष आनंद

पुणे :  राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराणे वेग घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी पदयात्रा आणि रॅली च्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. पाटील इस्टेट मधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा, पुनर्विकासचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे, इथल्या एकाही कुटुंबाला वाऱ्यावर न सोडत हा प्रश्न राज्य सरकारच्या मदतीने सोडवू असे आश्वासन मनिष आनंद यांनी दिले.पाटील इस्टेट भागात काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आनंद यांनी हे आश्वासन दिले.पुढे बोलताना मनिष आनंद म्हणाले, मी आमदार झाल्यावर शिवाजीनगर मतदारसंघातील झोपडपट्टी, वस्ती विभागाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा माझा निर्धार आहे. पाटील इस्टेट मधील लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय म्हणजे या लोकांना नवीन जागी घर मिळाल्याशिवाय इथला पुनर्विकास होणार नाही यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी देशाचे माजी  राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आयडिएशन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. या सेंटर च्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांच्या भरारीला राज्य आणि केंद्र सरकारचे बळ कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनिष आनंद यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!