‘यशस्वी’ संस्थेच्या ‘यशोगाथा’विशेषाकांचे प्रकाशन संपन्न
पिंपरी : : आपला देश आज विविधक्षेत्रात वेगाने प्रगती करीत असताना युवा पिढीने सुद्धा आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारून कार्यशील होण्याचाप्रयत्न करायला हवा,असे मत कीट्रॉनिक्स इंडियालिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते आज प्रजासत्ताक दिन सोहोळयानिमित्त चिंचवड येथील यशस्वी संस्थेच्या ‘यशोगाथा’ विशेषाकांचे प्रकाशन करताना बोलत होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कीट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडच्या संचालिका मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, देशात आज अनेक सोयी-सुविधा असताना नवे प्रश्नसुद्धा आहेत, निसर्गावरचं अतिक्रमण, प्लास्टिकचाअतिवापर, सामाजिक भानाचा अभाव अशा समस्या वाढलेल्या दिसतात. नागरीक म्हणून देशाप्रती आपली जी भावना आहे ती वाढवायला हवी, दूसरा कोणीतरी बदल घडवेल अशी वाट न बघता आपण स्वतः काय बदल घडवू शकतो हा विचार करून कृतिशील व्हायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी ‘यशस्वी’ संस्थेतील अविनाश कांबळे व राजेंद्र काळडोके या दोन कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, ऑपरेशन विभाग प्रमुख कृष्णा सावंत, संस्थेचे मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
—


