17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeदेश-विदेशपाच लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती

पाच लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती

पंढरपूर -माघ यात्रा दिनांक 8 फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून, या यात्रेत येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी पाच लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

माघी,चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजरा करण्यात येतात. यामध्ये माघी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होत आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळावा यासाठी 5 लाख बुंदी लाडू प्रसाद व 50 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धता ठेवण्यात येत आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट 20 रुपये प्रमाणे व 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट 10 रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल स.6.00 ते रा. 12.00 पर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत.

बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्था पासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून तयार करण्यात येत आहे. या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे. भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करतांना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे.

माघ शुद्ध जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्य पूजा अनुक्रमे मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.

सह अध्यक्ष औसेकर महाराज यांनी बुंदी लाडू प्रसाद उत्पादन केंद्राची पाहणी केली असून, यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, सहाय्यक विभाग प्रमुख दत्तात्रय इंगळे उपस्थित होते.

सदरचा बुंदी लाडू प्रसाद तयार करण्यासाठी 100 क्विंटल हरभरा डाळ, 150 क्विंटल साखर, 8 हजार किलो शेंगदाणा डबल रिफाईंड तेल, 150 किलो काजू, 200 किलो बेदाणा, 10 किलो विलायची, 500 ग्रॅम केसरी रंग इत्यादी मालाची खरेदी करण्यात आली असून, प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरण पूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत आहे. सुमारे 80 कर्मचारी लाडू प्रसाद तयार करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

माघीवारी निमित्त पाच लाख लाडूंची व्यवस्था
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
3.1kmh
18 %
Tue
17 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!