Reserv Bank | मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी पहिल्या मौद्रिक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे निकाल ८ एप्रिलला जाहीर केले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे आणि यामध्ये कोणतीही बदल करण्यात आलेली नाहीत.
आरबीआयने पॉलिसी स्टान्स न्यूट्रल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, हे निर्णय जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतले गेले आहेत. कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
जर आपण बँकेकडून फ्लोटिंग रेटवर लोन घेतले असेल, तर सध्या तुमच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो रेटमध्ये बदल थेट बँकांच्या कर्ज व ठेवीच्या व्याजदरांवर परिणाम करतो.
रेपो रेट कमी केल्यास बँका कर्जाचे व्याजदर कमी करतात.
रेपो रेट वाढल्यास बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात.
रेपो रेट असा दर आहे, ज्यावर आरबीआय देशातील बँकांना पैसे उधार देते. त्यामुळे रेपो रेटचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवरही होतो.
मागील वर्षीचे रेपो रेटमधील बदल
फेब्रुवारी २०२५: ६.५० ६.२५ टक्के
एप्रिल २०२५: ६.२५ ६ टक्के
जून २०२५: ६ ५.५० टक्के
ऑगस्ट २०२५: स्थिर ५.५० टक्के
ऑक्टोबर २०२५: स्थिर ५.५० टक्के
डिसेंबर २०२५: ५.५० ५.२५ टक्के
फेब्रुवारी २०२६: स्थिर ५.२५ टक्के


