तळेगांव- मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, आयोजित जाहीर सभेत मावळातील बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी बापूसाहेब भेगडे यांना निवडून देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी मावळवासियांना आवाहन केले.मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका आरपीआय (आठवले गट)चे वरिष्ठ सचिव संतोष कदम, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजपा महिला आघाडीप्रमुख सायलीताई बोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. रुपालीताई दाभाडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या सभेला संबोधित करताना ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना म्हणाले, की मावळात गेल्या पाच वर्षात लबाडी आणि फक्त लबाडीच सुरू होती. आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले. त्यांचे व्यवसाय बंद पाडले, कामे काढून घेतली आणि फक्त कमिशन एजंटचे काम केले. त्यामुळे मावळची जनता यांच्या कारभाराला वैतागली असून, आता परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असेही बाफना यांनी सांगितले. काँग्रेस नेते रामदास काकडे यांनी प्रखर शब्दात टीका करताना आमदार सुनील शेळके यांच्या कामाचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, मावळच्या जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. मात्र ,त्यावेळी यांच्यातला राक्षस ओळखण्यात जनता कमी पडली. तो पक्का सोंगाड्या आहे. आमदारांनी विकासाचे काम करायचे असते. यांना पाच वर्षात आमदारकी कळलीच नाही. एमआयडीसीमध्ये शासनाच्या माध्यमातून कामे करून तरुणांच्या हाताला काम द्यायला हवे होते. मात्र, तसे न करता गोरगरीब मुलांची कामे काढून घेतली आणि स्वतःची माणसे पोसली. शाळा कॉलेजची बांधकामे बंद केली. गेल्या पाच वर्षात मावळ तालुक्यातील तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात व्यसन, गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागली आहे. भ्रष्टाचाराने तर कळस गाठला आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यामुळे मावळ विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही रामदास काकडे यांनी केले.
मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
27.5
°
C
27.5
°
27.5
°
40 %
3.3kmh
0 %
Thu
28
°
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°