29.7 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeविश्लेषणमहात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), ही महाराष्ट्रातील गरजूंना मोफत आरोग्य सुविधा देणारी शासकीय योजना आहे. महायुती सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ मध्ये योजना सुरु झाल्यापासून प्रथमच योजनेतील सुविधा वाढवण्यात येत आहेत. सुधारित नियमांनूसार वार्षिक प्रीमियम 60% ने वाढून रु. 3,000 कोटींपर्यंत जाईल. राज्यातील सर्व नागरिकांना सार्वत्रिक आणि सर्वांना आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने ही सुधारित योजना १ जुलै रोजी सुरू होणार आहे.

पण MJPJAY म्हणजे काय? त्याचा गरजू लोकांना फायदा होतो का? जर होय, तर या यशस्वी आरोग्य योजनेचे फायदे काय आहेत? चला या योजनेबद्दल सखोल विचार करूया… MJPJAY 2.0 काय असेल?

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), ही महाराष्ट्रातील गरजूंना मोफत आरोग्य सुविधा देणारी शासकीय योजना आहे. महायुती सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ मध्ये योजना सुरु झाल्यापासून प्रथमच योजनेतील सुविधा वाढवण्यात येत आहेत. सुधारित नियमांनूसार वार्षिक प्रीमियम 60% ने वाढून रु. 3,000 कोटींपर्यंत जाईल. राज्यातील सर्व नागरिकांना सार्वत्रिक आणि सर्वांना आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने ही सुधारित योजना १ जुलै रोजी सुरू होणार आहे.

पण MJPJAY म्हणजे काय? त्याचा गरजू लोकांना फायदा होतो का? जर होय, तर या यशस्वी आरोग्य योजनेचे फायदे काय आहेत? चला या योजनेबद्दल सखोल विचार करूया… MJPJAY 2.0 काय असेल?

राज्यातील गरीबी रेषेखालील कुटुंबातील गरजू लाभार्थ्यांना चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात हा महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य अभियानाचा उद्देश आहे. सुरुवातीला २०१२ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ८ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ३५ जिल्ह्यात या योजनेची सुरुवात झाली. ही योजना सुरु झाल्या पासून ४२ लाख ९७ हजार ४० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि ७५ लाख १५ हजार ६२६ लाभार्थ्यांच्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या प्रमुख आरोग्य विमा योजनेत अर्थात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियानात नावनोंदणी केली आहे. या योजनेअंतर्गत एकंदर 15 हजार 758 कोटी 9 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

या अभियानासाठीची मागणी लक्षात घेता महायुती सरकारने योजनेचा विस्तार आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. MJPJAY 2.0 राज्यातील प्रत्येक नागरिकाला वैध शिधापत्रिका आणि अधिवास प्रमाणपत्र असल्यास, आरोग्य सुविधा प्रदान करेल. प्रती कुटुंब कव्हरेज रक्कम दिड लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

कव्हर केलेल्या वैद्यकीय प्रक्रियांची संख्या ९९६ वरून १,३५६ पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि नोंदणीकृत रुग्णालयांची संख्या १००० वरून १,९०० पर्यंत वाढली आहे. या योजनेचा लाभ देणारी रुग्णालयांची संख्या, विविध आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि योजनेच्या अंमलवजावणीत येणाऱ्या अडचणींचा, सुधारणा करताना विचार करण्यात आला. या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाच वर्षांत योजनेंतर्गत केलेल्या शस्त्रक्रियांची संख्या 6 लाखापेक्षा जास्त झाली असून ती 70%नी वाढली आहे. 2019-20 मध्ये ६ लाख असलेली लाभार्थ्यांची संख्या 2023-24 मध्ये 10 लाख 25 हजार पर्यंत वाढली आहे. १ जुलैपासून लागू होणाऱ्या सुधारणा राज्यात MJPJAY लागू झाल्यापासूनची ही सर्वात मोठी सुधारणा आहे.

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा

  • आरोग्य योजनेअंतर्गत ९७१ विविध आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
  • ३० निर्धारीत श्रेणींमध्ये १२१ प्रकारच्या फॉलो-अप प्रक्रियेचा समावेश आहे.
  • यातील १३२ प्रक्रिया अशा आहेत ज्या तज्ञ डॉक्टर्सच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांत केल्या जातात.
  • मुत्र प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी अडीच लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात.
    महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) साठीची पात्रता
  • लाभार्थी कुटुंब राज्यात नोंदणी असलेल्या संकटग्रस्त जिल्ह्यांतील असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्याकडे पांढरे/केशरी/पिवळे शिधापत्रिका, अन्नपूर्णा कार्ड किंवा अंत्योदय अन्न योजना कार्ड (AAY) असावे.
  • अमरावती, अकोला, औरंगाबाद, बुलडाणा, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या कृषीदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी
  • कृषीदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे पांढरे शिधापत्रिका, ७/१२ उतारा, लाभार्थीचे नाव/कुटुंब प्रमुख किंवा संबंधीत तलाठी किंवा पटवारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एकूणच, MJPJAY ही एक महत्वपूर्ण योजना आहे जी BPL कुटुंबांच्या आणि आता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते. तथापि, अशी काही क्षेत्रे आहेत जिथे योजना सुधारली जाऊ शकते, जसे की व्याप्ती वाढवून, पॅनेलमध्ये सुधारणा करून आणि जागरुकता वाढवून. तेव्हा या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्यासाठी प्रशासनातर्फे नेहमी आवाहन करण्यात येते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
69 %
3.8kmh
63 %
Sun
32 °
Mon
30 °
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!