17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeताज्या बातम्याफडणवीस सरकारचा मोठा निर्णय: इस्लामपूरचं नाव ‘ईश्वरपूर’

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: इस्लामपूरचं नाव ‘ईश्वरपूर’

Maharashtra | महाराष्ट्रातील शहरांच्या नामांतराच्या मालिकेत आणखी एक शहर सामील होणार आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ करण्यात येणार आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

५० वर्षांची मागणी अखेर पूर्ण
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत माहिती दिली की, इस्लामपूरचं नाव बदलण्याची मागणी गेल्या चार-पाच दशकांपासून सुरू होती. आरएसएसचे तत्कालीन स्थानिक प्रमुख पंत सबनीस यांनी ही मागणी सर्वप्रथम केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही १९८६ मधील सभेत इस्लामपूरला ‘ईश्वरपूर’ असं संबोधलं होतं.

महाराष्ट्रातील नावबदलाची मालिका सुरूच
गेल्या काही वर्षांत राज्यातील अनेक ऐतिहासिक शहरांची नावं बदलली गेली आहेत. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता इस्लामपूर हे चौथं शहर ठरणार आहे, ज्याचं नाव औपचारिकरीत्या ‘ईश्वरपूर’ करण्यात येईल.

केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर या नावबदलाची अधिकृत अंमलबजावणी होणार आहे.

News Title: Maharashtra Govt Renames Islampur to Ishwarpur – Proposal Sent to Centre

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!