16.1 C
New Delhi
Thursday, December 11, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएसआयपी अॅकॅडमीचा २२ वर्षे पूर्तीचा आनंदोत्सव १२५० हून अधिक केंद्रे आणि मुलांसाठी...

एसआयपी अॅकॅडमीचा २२ वर्षे पूर्तीचा आनंदोत्सव १२५० हून अधिक केंद्रे आणि मुलांसाठी रॉकेट लाँच ड्रीमची योजना

पुणे – : बालकांच्या कौशल्य विकास क्षेत्रातील भारतातील दिग्गज कंपनी एसआयपी अॅकॅडमीने कामकाजाची २२ वर्षे पूर्ण करून आणि देशभरात १२५० हून अधिक फ्रँचायझी केंद्रांचा विस्तार करून नुकताच एक मोठा टप्पा पार केला. त्यामुळे ती भारतातील सर्वात मोठ्या शालेय शिक्षण नेटवर्कपैकी एक बनली आहे.

एसआयपी अ‍ॅबॅकस, ग्लोबलआर्ट, मायकिड्स आणि क्रिको इंग्लिश यांसारखे प्रमुख कार्यक्रम राबविणाऱ्या या अॅकॅडमीने जीआरटी हॉटेल्सच्या ग्रँड चेन्नई येथे भव्य प्रमाणात हा वर्धापनदिन साजरा केला. या कार्यक्रमात शीर्ष फ्रँचायझी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि भागीदार सहभागी झाले होते. भारतातील १४ लाखांहून अधिक मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या प्रवासाचा हे सर्व जण भाग आहेत.

या उत्सवात एसआयपी अॅकॅडमीने शिक्षण, उत्साह आणि पर्यावरणीय कृती यांचा मिलाफ साधणारे तीन मोठे उपक्रम यावेळी जाहीर केले.

यामध्ये इस्रोच्या रॉकेट प्रक्षेपणाचा भव्य पुरस्कार असलेली राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धा हा प्रमुख उपक्रम आहे. एसआयपीची प्रमुख अंकगणितीय जीनियस स्पर्धा (अॅरिथमेटिक जीनियस कॉन्टेस्ट -एजीसी) ची १० वी आवृत्ती ही केवळ एक स्पर्धा नाही. ती भारताच्या भविष्याचे एक अग्रस्थान आहे. या वर्षी राष्ट्रीय विजेत्यांना श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या रॉकेट प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे. त्यामुळे ते विज्ञान आणि अंतराळातील भारताच्या धाडसी कामगिरीचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरतील.

भारताच्या अंतराळ आघाडीचा हा थेट अनुभव मुलांना देऊन एसआयपी अॅकॅडमी शैक्षणिक उत्कृष्टतेला पुरस्कृत करण्यापेक्षा आणखी बरेच काही करत आहे. ती कल्पनाशक्तीला चालना देत आहे, स्टेमच्या (एसटीईएम) स्वप्नांना चालना देत आहे आणि तरुण भारतीयांना देशाच्या वैज्ञानिक आकांक्षांच्या केंद्रस्थानी ठेवत आहे.

विद्यार्थ्यांना इको-चॅम्पियन बनवण्यासाठी तीन नवीन मियावाकी जंगले ही दुसरी योजना आहे. हवामान बदलाभोवती चर्चा जोर पकडत असताना एसआयपी अॅकॅडमी निसर्गाला शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणून कृती करत आहे. आपल्या २२ व्या वर्षाचे औचित्य साधून, ब्रँडच्या वतीने कोलकाता, तंजावर आणि शिवकाशी येथे तीन नवीन मियावाकी जंगले लावण्यात येणार आहे. वेगाने वाढणाऱ्या जपानी तंत्राचा वापर करून तयार केलेली ही दाट, स्थानिक हिरवीगार क्षेत्रे असतील.

ही शहरी जंगले जिवंत वर्गखोल्यांचे काम करतील, तिथे मुले केवळ पर्यावरणाबद्दल शिकणार नाहीत तर ते पुनर्बांधणीत सक्रियपणे योगदान देतील. शिक्षण हा केवळ परीक्षांचा नाही तर जबाबदारी, शाश्वतता आणि भविष्यासाठी तयार नागरिक घडवण्याचा विषय आहे, हा मोठा संदेश देणारे हे एक छोटे पाऊल आहे.

भारताच्या बौद्धिक शक्तीला उजाळा देणारी नवी राष्ट्रीय टीव्ही मोहीम हा तिसरा उपक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेली नवीन एसआयपी अॅबॅकस टीव्हीची जाहिरात विद्यार्थ्यांच्या लाजाळू आणि विचलितपासून चाणाक्ष, आत्मविश्वासू आणि एकाग्र अशा वास्तविक जीवनातील परिवर्तनावर लक्ष केंद्रित करणारी आहे. देशभरात सुरू झालेल्या या मोहिमेतून समग्र विकास शोधणाऱ्या पालकांसाठी एक उत्तम ब्रँड म्हणून एसआयपीला समोर ठेवण्यात आले आहे.

एसआयपी अॅकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश व्हिक्टर म्हणाले, “शॉर्टकटच्या मागे लागणाऱ्या या जगात, आम्ही प्रत्येक मुलामध्ये खरी कौशल्ये निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहिलो आहोत. आमच्या ध्येयावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा, शिक्षकाचा, फ्रँचायझीचा आणि पालकांना या कामगिरीचे श्रेय आहे. नावीन्यपूर्णता, शाश्वतता आणि संपूर्ण हृदयपूर्णतेने परिणामाची व्याप्ती वाढविणे हा आमचा पुढचा अध्याय आहे.”

एसआयपी अॅकॅडमी २३व्या वर्षात प्रवेश करत असताना केवळ वाढत नाही तर ती भारतातील शाळेनंतरच्या शिक्षण परिसंस्थेला नवा आकार देत आहे. फ्रेंचायझिंगचे यश, सामाजिक हित आणि व्याप्ती वाढविण्याजोग्या शिक्षण साधनांसह ब्रँड हे सिद्ध करत आहे, की शाळा सुटल्यानंतरच खरे शिक्षण सुरू होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
63 %
0kmh
0 %
Thu
20 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!