30.2 C
New Delhi
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रआळंदीत उभारणार 'ज्ञानपीठ' – मुख्यमंत्री फडणवीसांची ऐतिहासिक घोषणा

आळंदीत उभारणार ‘ज्ञानपीठ’ – मुख्यमंत्री फडणवीसांची ऐतिहासिक घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथे ४५० एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, या उपक्रमाच्या माध्यमातून भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभर पोहोचविण्याचा उद्देश आहे.

पुणे, -:वारकरी संप्रदायाच्या पवित्र नगरी आळंदी येथे जगाला हेवा वाटेल असे “संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ” उभारण्यात येणार असल्याची ऐतिहासिक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जागतिक स्तरावर पोहोचावेत, या उद्देशाने हा भव्य प्रकल्प ४५० एकर जागेवर उभारण्यात येणार असून त्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.

📍 सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस हे आळंदी येथे आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.

🌊 इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी तयार केलेला विकास आराखडा केंद्र सरकारकडे पाठवला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. या माध्यमातून ३९ गावांचे सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडले जाईल. त्यामुळे इंद्रायणीचे जल पुन्हा निर्मळ, स्वच्छ व पवित्र होईल.”

📚 ज्ञानपीठ – अध्यात्मिक आणि वैचारिक समृद्धीचे केंद्र

ज्ञानपीठ स्थापनेचा हेतू फक्त स्थापत्य नव्हे तर भारतीय अध्यात्म, संतविचार, आणि मानव कल्याणाच्या मूल्यांचा प्रसार करणे आहे. हे पीठ आधुनिकतेसह पारंपरिक संतसाहित्य, प्रवचने, संशोधन आणि अध्यात्मिक अध्ययनासाठी जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरेल.

🙏 संतांचा विचार – मानवतेची खरी संपत्ती

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भौतिक प्रगतीतून शांती मिळत नाही, तर ती संतांच्या विचारातून मिळते. वारकरी संप्रदायाने परकीय आक्रमण काळातही भागवत धर्माचे रक्षण केले. त्यांनी रुजवलेल्या चांगल्या विचारांमुळेच आज समाजात मानसिक आरोग्य आणि सांस्कृतिक शुद्धता टिकून आहे.”

📖 ‘नमो ज्ञानेश्वरा’ ग्रंथ व ऑडिओ बुकचे प्रकाशन

कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समग्र वाङ्मयावर आधारित ‘नमो ज्ञानेश्वरा’ या चिंतनात्मक ग्रंथाचे तसेच त्याच ग्रंथाचे ऑडिओ बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

🏅 सन्मान आणि गौरव

या सोहळ्यात ह.भ.प. गु. मारुती महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा सत्कारही करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
58 %
0.1kmh
100 %
Mon
30 °
Tue
37 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!