आजपासून श्रींच्या महानैवेद्यामध्ये आमरसाचा समावेश,
पंढरपूर – हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असतं. त्यानिमित्ताने श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
यामध्ये श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंच पेटी तांबडी, जव मणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोळ, सरी, कंबर पट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच परंपरेनुसार अक्षय तृतीया पासून वटपोर्णिमे पर्यंत श्रींच्या महानैवेद्यामध्ये शेवयाची खीर ऐवजी आमरसाचा समावेश करण्यात येत आहे. अशी माहिती प्रविणकुमार घम यांनी सांगितले.


